Posts

Showing posts from February, 2025

नरंदे यात्रेतील कुस्ती मैदान थांबल्याने कुस्ती शौकिनांच्यात नाराजी.

Image
  नरंदे यात्रेतील कुस्ती मैदान थांबल्याने कुस्ती शौकिनांच्यात नाराजी. ------------------------ कुंभोज प्रतिनिधी  विनोद शिंगे ------------------------ नरंदे तालुका हातकलंगले येथे नागनाथ देवाच्या यात्रेनिमित्त गेल्या पन्नास वर्षापेक्षा जास्त वर्षाची परंपरा असणारी कुस्तीचे मैदान यावेळी का थांबले असून त्यामुळे कुस्ती शौकिनांच्यातून नाराजी व्यक्त होत आहे. परिणामी नरंदे गावचे लोकनेते कै सिताराम बापू भंडारी यांनी कुस्ती परंपरेला सुरुवात केली व त्या कुस्ती परंपरेची सुरुवात म्हणून नरंदे गावचे ग्रामदैवत नागनाथ देवाच्या यात्रेनिमित्त केल्या पन्नास वर्षापासून जास्त कालावधीत नरंदे येथे यात्रेच्या तिसऱ्या दिवशी भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन केले जात होते. सदर कुस्ती मैदानमध्ये महाराष्ट्रातील नामवंत मल्लाचा सहभाग कुस्तीसाठी असायचा लोकनेते सिताराम बापू भंडारी यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव पैलवान बबन भंडारी यांनी सदर कुस्तीची परंपरा अबाधित ठेवली व त्यांनी ती अनेक वर्ष चालू ठेवली सदर नरंदे कुस्तीच्या मैदानातून अनेक मल्ल सध्या महाराष्ट्रात कार्यरत असून त्यापैकीच एक म्हणजे नरंदे गावचे सुपुत्र व ...

दैनिक युवक आधारचे संपादक संतोष आमले यांना साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान

Image
दैनिक युवक आधारचे संपादक संतोष आमले यांना साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान. थोर क्रांतिकारक साहित्यिक स्वातंत्र्यसेनानी व समाजवादी विचारवंत साने गुरुजी यांची 24 डिसेंबर रोजी शतकोत्तर रोप्यमहोत्सव जयंती साजरी करण्यात आली त्यानिमित्त   परेल मुंबई येथे रविवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी सामाजिक कार्यकर्ता समन्वय समिती ( महाराष्ट्र राज्य),च्या वतीने विशेष उल्लेखनिय कार्याचा व सेवेचा गौरव म्हणून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमांमध्ये साने गुरुजी यांच्या भारतीय संस्कृती बाबतचा विचारांची उजळणी करण्यात आली तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले  त्यामध्येच युवा नेतृत्व म्हणून दैनिक युवक आधारचे संपादक, कर्तुत्वान, अभ्यासू, जनसंपर्क व्यक्तिमत्व  संतोष शिवदास आमले यांना साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार मुंबई विद्यापीठाचे *मा.कुलगुरु तथा माजी खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते मुंबई येथील कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. आता पर्यंत संतोष आमले यांना दादासाहेब फाळके 2025 अवॉर्ड  तसेच ललकारी सन्मानाची राज्यस्तरीय पुरस्...

जीबीएस विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसओपी प्रमाणे आवश्यक कार्यवाही करावी.

Image
  जीबीएस विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसओपी प्रमाणे आवश्यक कार्यवाही करावी. ----------------------------------- कुंभोज प्रतिनिधी  विनोद शिंगे ----------------------------------- जीबीएस विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसओपी प्रमाणे आवश्यक कार्यवाही करावी. तसेच जीबीएस रुग्णांची दैनंदिन अद्यावत माहिती वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे आयुक्त यांना मंत्री हसन मुश्रीफ यांनी सादर करावी, अशा सूचना दिल्या. मंत्रालय येथे जीबीएस विषाणूच्या प्रादुर्भाव बाबत झालेल्या आढावा बैठक पार पडली. यावेळी मुंबई वैद्यकीय शिक्षण व संशोधनचे आयुक्त राजीव निवतकर, मुंबई वैद्यकीय शिक्षण व संशोधनचे संचालक डॉ. अजय चंदनवाले, आयुषचे संचालक डॉ. रमण घुंगराळेकर आदी प्रत्यक्ष तर सर्व शासकीय वैद्यकीय, आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता तसेच टास्क फोर्सचे अध्यक्ष दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. या विषाणुबाबत नागरिकांमध्ये उपाययोजनांसाठी जनजागृती करण्यात यावी. ज्यामुळे विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे आरोग्य यंत्रणांनी देखील आवश्यक औषध पुरवठा आणि साधनसामुग्री उपलब्ध करून घ्यावी, ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पाचे केले कौतुक; म्हणाले.

Image
  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पाचे केले कौतुक; म्हणाले. ------------------------   मिरज तालुका प्रतिनिधी  राजू कदम ------------------------  अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील दुसरा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले. मध्यम वर्गाने या निर्णयाचे स्वागत केले असताना आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे. ते म्हणाले, “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांनी मध्यम वर्गासाठी एक स्वप्नवत असा अर्थसंकल्प मांडला आहे. अपेक्षेपेक्षा अधिक देण्याचा प्रयत्न केला आहे. १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे. सात लाखांची असलेली मर्यादा थेट १२ लाखांपर्यंत नेण्यात आली आहे. त्यामुळे आता १२ लाख उत्पन्न असलेल्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही. याचा मोठा फायदा मध्यम वर्गीय, नोकरदार आणि तरुणांना होणार आहे. यामुळे मोठे उत्पन्न मध्यमवर्गींच्या खिशात येणार आहे. हे उ...

नागरिकानो टी.बी रुग्णांसाना सहानुभूती आणि समर्थन द्या ; प्रदिप पट्टेबाहदुर.

Image
 नागरिकानो टी.बी रुग्णांसाना सहानुभूती आणि समर्थन द्या ; प्रदिप पट्टेबाहदुर.  -------------------------  रिसोड प्रतिनिधी रणजित सिंह ठाकुर  -------------------------   : दि.2 डिसेंबर टीबी (क्षय रोग) हा एक गंभीर आणि संक्रामक रोग आहे. त्यामध्ये व्यक्तीला शारीरिक कष्ट,मानसिक त्रास आणि सामाजिक वेगळेपणाचा सामना करावा लागतो. टीबीच्या रुग्णांशी सहानुभूती दाखवणे अत्यंत महत्त्वाचे असे मत जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र शासन तथा मा.राष्ट्रिय युवा कोर ने.यु.के.भारत सरकार प्रदिप पट्टेबाहदुर आपल्याला राजा प्रसेनजित संस्था व नेहरू युवा बहुउद्देशीय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मटले आहे. टीबी १०० दिवस विशेष शोध मोहिमेच्या अनुषंगाने नागरिकांनी क्षयरोग विभाग कर्मचारी तथा ग्राम पातळीवर कार्य करणारे आरोग्य कर्मचारी यांना देखील सहकार्य केले पाहिजे. त्याचबरोबर त्यासाठी नागरिकानी काही गोष्टींचा विचार केला पाहिजे समजून घेणं आणि सहकार्य करणे टीबी रुग्णांना समजून घ्या. त्यांचे दु:ख आणि संघर्ष ओळखा. त्यांच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाबद्दल संवेदनशील रहा.  मानसिक समर्थ...

रिसोड येथे श्रामणेर शिबिरांचे उद्घाटन.

Image
  रिसोड  येथे  श्रामणेर  शिबिरांचे  उद्घाटन.  -----------------------------------  . रिसोड. प्रतिनिधि    रणजीत सिंह ठाकुर  ----------------------------------- रिसोड  : भारतीय बौद्ध  महासभेचे  राष्ट्रीय कार्याध्यक्ष आद.भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब  यांच्या आदेशानुसार  डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांची धम्म  क्रांती  गतिमान  करण्या साठी विविध  प्रकारचे संस्कार  शिबीर  घ्या  या  नुसार  भारतीय बौद्ध  महासभा  रिसोड  शाखेच्या  वतिने जिल्हाध्यक्ष सिध्दार्थ भगत  यांच्या मार्गदर्शत संबोधी बुद्ध विहार एकता नगर,दहा दिवसीय श्रामणेर श्रामणेरांचे  उद्घाटन   तालुकाध्यक्ष  शालिग्राम  पठाडे  यांच्या  हस्ते झाले, दहा दिवसीय श्रामणेर शिबीरांचे  अध्यक्ष  भगवान  जाधव, .  संघनायक  पुज्य.भंते महेंद्र  बोधी, केंद्रीय शिक्षक देवानंद  वानखेडे  नागपुर  नियोजित  आहेत. या शिबिरात  भगवान...

राधानगरी तालुक्यातील दोघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत.

Image
  राधानगरी तालुक्यातील दोघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत. ----------------------------  राधानगरी प्रतिनिधी  विजय बकरे  ---------------------------- काल दिनांक 31 जानेवारी रोजी राधानगरी तालुक्यातील मांगोली आणि ठिकपुर्ली येथे पाण्यात बुडून दोघाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.  मांगोली येथील दत्तात्रय ईश्वरा पाटील हे येथील आपल्या नावली नावाच्या शेतामधील ऊस पिकाला पाणी पाजण्यासाठी गेले असता विहिरीवरील मोटार चालू करत असताना पाय घसरून विहिरीत पडले. ही घटना आसपासच्या शेतकऱ्यांना समजल्यानंतर त्यांनी पाटील यांना उपचाराकरिता सोळांकुर येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तर ठिकपुर्ली येथील वैशाली सर्जेराव कांबळे ही चाळीस वर्षीय महिला सकाळी साडेदहाच्या सुमारास कॅनॉल मध्ये कपडे धुण्याकरिता गेली असता पाय घसरून पडल्यामुळे त्यांचा दुदैवी मुत्यू झाल्याची दुसरी घटना घडली  त्यांनाही उपचार करता सोळांकुर रुग्णालयात नेल असता  डॉक्टरांनी मृत घोषित केले. सदर दोन्ही घटनांची नोंद राधानगरी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार...