पंतप्रधान पिक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांनी अतिरिक्त पैसे देऊ नये:- मगनदास तावरे तालुका कृषी अधिकारी.
-------------------------------------
रिसोड प्रतिनिधी
रणजीत सिंह ठाकुर.
-------------------------------------
राज्य शासनाने प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात पिक विमा भरण्याची योजना सुरू केली आहे.मात्र सध्या खरीप हंगामाचा विमा भरताना काही सी.एस.सी केंद्र चालक शेतकऱ्याकडून आगाव रक्कम वसूल करत असल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पंतप्रधान पिक विमा काढताना फक्त एक रुपया शुल्क द्यावा असे आव्हान रिसोड तालुका कृषी अधिकारी मगनदास तावरे यांनी केले आहे.सीएससी केंद्र चालकांनी सुद्धा शेतकऱ्यांचा पंतप्रधान पिक विमा योजनेच्या नावाखाली शेतकऱ्याकडून अतिरिक्त रक्कम घेऊ नये अन्यथा सीएससी केंद्रावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असा इशारा तालुका कृषी अधिकारी मगनदास तावरे यांनी दिला आहे.सदर केंद्र चालकांना विमा भरून घेण्यासाठीचे मानधन शासन नियमित देते.त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांना विनंती आहे की विमा भरताना एक रुपयाच्या वर आगाऊ रक्कम देऊ नये. केंद्र चालकाने आगाऊ रकमेची मागणी केल्यास शक्य त्या पुराव्यासह कृषी हेल्प लाईनच्या 9822446655 या क्रमांकावर व्हाट्सप द्वारे थेट तक्रार करावी किंवा स्थानिक तालुका कृषी अधिकारी कार्यालयात तक्रार द्यावी, सदर केंद्र चालकावर ग्रामविकास विभागाच्या मदतीने कडक कारवाई केली जाईल. शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही.
0 Comments