Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

दहावीचे वर्ष हे विद्यार्थी जीवनाला दिशा देणारे वर्ष....शिक्षक आमदार किरणराव सरनाईक.

 दहावीचे वर्ष हे विद्यार्थी जीवनाला दिशा देणारे वर्ष....शिक्षक आमदार किरणराव सरनाईक.

-----------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड प्रतिनिधी

 रणजीत सिंग ठाकूर 

-----------------------------

दहावीचे वर्ष हे विद्यार्थी जीवनाला दिशा देणारे वर्ष असून हे वर्षच विद्यार्थ्यांचे भविष्य कोणत्या दिशेने जाणार हे ठरविण्यासाठी उपयुक्त ठरते असे प्रतिपादन स्थानिक श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड येथे वर्ग  दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत असताना अमरावती विभागाचे शिक्षक आमदार ॲड किरणराव सरनाईक यांनी केले.

श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड येथे दिनांक 28  मे 2024 रोजी इयत्ता  दहावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्था वाशिम चे अध्यक्ष तथा अमरावती विभागाचे शिक्षक आमदार ॲड किरणराव सरनाईक हे होते तर प्रमुख उपस्थितांमध्ये स्थानिक शाळा समिती संचालक पंजाबराव देशमुख, जितेंद्रकुमार दलाल, संजयकुमार जिरवणकर,कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य संजयराव देशमुख, उपमुख्याध्यापक संजयराव नरवाडे,शिवाजी प्राथमिक मराठी चे मुख्याध्यापक सचिन देशमुख,उर्दू प्राथमिक चे मुख्याध्यापक अनिस खान हे उपस्थित होते. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज व शिवाजी शिक्षण संस्थेचे आद्य संस्थापक स्व.ॲड आप्पासाहेब सरनाईक यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचा शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये 90% व त्याहून अधिक गुण प्राप्त करणाऱ्या 42  गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह शाळेच्या वतीने भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी संचालक पंजाबराव देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, तसेच पालकांमधून श्री शिरसाट यांनी आपले विचार व्यक्त केले. अध्यक्षीय स्थानावरून पुढे बोलताना ॲड.किरणराव सरनाईक म्हणाले की, विद्यार्थ्यांसाठी दहावीचे वर्ष अत्यंत महत्त्वाचे असते हे वर्ष त्यांच्या पुढील शैक्षणिक जीवनाला वळण देणारे वर्ष असते. आजच्या काळामध्ये गुणवत्ता जरी वाढली असली तरी स्पर्धाही तितकीच वाढलेली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी न डगमगता आत्मविश्वास व मेहनत करण्याची जिद्द  दाखविल्यास त्यांना इच्छित ध्येय गाठण्यास मदत होते.  तसेच ते म्हणाले की दरवर्षीच शाळेचा  निकाल चांगला लागतो मात्र यावर्षी 90% व त्याहून अधिक गुण प्राप्त करणारे 42 विद्यार्थी असल्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या शिक्षकांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्राचार्याची यामध्ये फार मोलाची भूमिका आहे. शाळेचा उत्कृष्ट निकाल लागल्यामुळे नव्याने रुजू झालेल्या प्राचार्य संजयराव देशमुख यांचे अध्यक्ष ॲड.किरणराव सरनाईक यांनी कौतुक करताना आता आपली जबाबदारी आणखी वाढली आहे याची आपण दक्षता घ्यावी असेही यावेळी सांगितले व ही परंपरा अशीच कायम ठेवण्याची त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांसह शाळेतील सर्व विषय शिक्षकांना दिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य संजयराव देशमुख  यांनी केले तर संचालन डिगांबर पाचरणे यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ शिक्षिका कविता चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments