संविधानाने दिलेल्या अधिकारांची अंमलबजावणी नाही करणे म्हणजे देशद्रोह करणे होय.
----------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
नागपूर प्रतिनिधी
सुरेश कपूर.
----------------------------------
नागपूर दि.२६/ संविधानाने दिलेले अनुच्छेद,कलम,पोट कलम हे प्रत्येक नागरीकांच्या शरिराचा अंग आहे त्या शिवाय तो जगू शकत नाही तो जगला तर देश जगेल देशाला बलशाली, आणि सन्मानाने साबूत ठेवायचे असेल तर संविधानाने दिलेल्या अधिकारांची अंमलबजावणी झाली पाहिजे असे अंमलबजावणी करणारी यंत्रणा ती करित नसेल तर त्या वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे असे प्रतिपादन आंविमो आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष सुरेश कपूर यांनी केले ते आज संविधान चौकात गणराज्य दिना निमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतांना बोलत होते. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून म्हाडा चे मुख्य वित्त लेखा अधिकारी जयदेव चिंवडे,राशिद अली प्रविण आवळे, हंसराज उरकुडे, गौतम बागडे, रामभाऊ वाहणे, चरणदास गायकवाड, अतुल गंगापूरे, वैशाली तभाने, संजिवनी कुमरे, शबाना खान, संगिता चंद्रीकापुरे, सुनिता चांदेकर,रुबीना खान नरेश खन्ना, भागन मेश्राम, सह मोठ्या संख्येने महिला पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments