स्वाभिमानी चे खर्डा भाकरी आंदोलन.
स्वाभिमानी चे खर्डा भाकरी आंदोलन.
-------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
शिरोली प्रतिनिधी
अमित खांडेकर
-------------------------------------------
गतवर्षीच्या हंगामातील गाळप केलेल्या ऊसाचा दुसरा हप्ता ४०० रुपये द्यावा, या मागणीसाठी राजू शेट्टी यांनी शिरोळमधून १७ ऑक्टोबर रोजी आक्रोश पदयात्रेला सुरुवात केली. या यात्रेला शेतकऱ्यांमधूनही चांगला प्रतिसाद मिळाला होता. २२ दिवसांच्या पदयात्रेची सांगता करत असताना जयसिंगपूरच्या ऊस परिषदेत चारशे रुपयांची मागणी करत ठिय्या आंदोलनाचीही घोषणा शेट्टी यांनी यावेळी केली.
यावेळी शेट्टींनी शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार नसेल, तर कारखानदारांचीही दिवाळी गोड होऊ देणार नाही, असा इशारा दिला होता. राजू शेट्टी यांचे जयसिंगपूरातील विक्रमसिंह मैदानात ठिय्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. आज धनत्रयोदशीच्या दिवशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी साखर कारखान्याचे अध्यक्ष व संचालकांच्या घरी जाऊन त्यांना खर्डा, भाकरी आणि कांदा भेट दिली.
स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आमदार प्रकाश आवाडे यांच्या इचलकरंजीतील निवासस्थानी जाऊन त्यांना खर्डा-भाकरी खाऊ घातली. तसेच काही कार्यकर्ते माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहे. दिवाळीच्या तोंडावर ऊस दर आंदोलनामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. यावेळी मी ही जातींवत शेतकरी असून शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी आणि ऊसदर कोंडी लवकर फुटावी अशी आशा महाडिक यांनी व्यक्त केली
यावेळी संघटनेकडून राहुल पाटील ( नागाव ) विक्रम पाटील , दिनकर पाटील योगेश खवरे राजू रेपे निलेश भोसले अशानंद मिठारी अमित खांडेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते
Comments
Post a Comment