Posts

Showing posts from August, 2023

विक्री बंदचे फलक लावूनही शहरात सहज मिळतो पानटपरीवर गुटखा.

Image
 विक्री बंदचे फलक लावूनही शहरात सहज मिळतो पानटपरीवर गुटखा.  --------------------------------------------   जयसिंगपूर: प्रतिनिधी  नामदेव भोसले -------------------------------------------- जास्त पैसे मोजा, हवे ते मिळवा : कारवाया, नियम केवळ नावालाच  एक गुटखा पुडी मिळते पाच रुपयांऐवजी दहा रुपयांना तर दुसरी २० रुपयांची पुडी मिळते ३० रुपयांना......तंबाखूजन्य पदार्थ विक्रीला मनाई आहे, पण ती कागदावरचा शहरातील मंदिरे असो किंवा शाळा सर्वच प्रतिबंधित क्षेत्रात पानटपरीवर सर्व काही सर्रास मिळते.तंबाखूजन्य पदार्थामुळे कॅन्सरसारखा दुर्धर आजार होतो. त्यामुळे त्याला शासकीय पातळीवर प्रतिबंध आहे. शाळा-महाविद्यालयांच्या आवारात तर शंभर मीटर अंतरावर अशा प्रकारच्या पदार्थाना विक्रीस मनाई आहे. मात्र, हे सर्व कागदावरच आहे. जयसिंगपूर, उदगाव, दोनोळी,कोथळी, उमळवाड अनेक पानटपऱ्यांच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन यासंदर्भात खात्री केली. विशेष म्हणजे महाविद्यालयाजवळील पानटपन्यांवर येथे तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा विकला जात नाही अशा आशयाचे फलक लावण्यात आले आहेत. परंतु जाणकारांना कुठे काय मिळते ते माहिती आहे आणि दुकानदारदेखील

जयसिंगपूर शहरात रोड रोमिओ ची हवा.

Image
  जयसिंगपूर शहरात  रोड रोमिओ ची हवा. ------------------------------------------------ जयसिंगपूर :प्रतिनिधी नामदेव  भोसले . ----------------------------------------------- चाय बर कॅफेमध्येअल्पवयीन मुला मुलींचा रोमान्स रोखण्यासाठी. निर्भया पथक कॅफेची चौकशी करण्याची गरज. जयसिंगपूर शहराला शिक्षणाचे माहेरघर मानले जाते शाहू महाराजांनी बसवलेल्या जयसिंगपूर शहरांमध्ये अनेक शाळा कॉलेजेस तसे क्लासेस  आहेत शाळा कॉलेजेस मधील मुलींना येता जाता रस्त्यावर रोड रोमियोंचा सामना करावा लागतो विविध शैक्षणिक संस्था तसेच कोचिंग क्लासेस परिसरात विद्यार्थिनींचा पाठलाग करून छेड काढण्याचे प्रकार वाढले आहेत त्यामुळे मुलींमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे कशाला नादी का लागायचे असे म्हणत विद्यार्थी पालक शांत बसत असल्यामुळे टवाळखोरांची हिम्मत वाढत आहे रस्त्यावरून येता जाता मुलींची छेड काढली जाते व त्यांना मोबाईल नंबर मागितला जातो हात वारे करून इशारा केला जातो कॅफे मध्ये किंवा रस्त्यावरून मुलींसोबत कोणत्याही कारणावरून मोबाईल नंबर मागितले जातात त्यांच्याशी मैत्री करून प्रेमात पाडून त्यांच्याशी अनैतिक संबंध ठेव

निकालातील चुकीचा फटका बसलेल्या विद्यार्थ्याला न्याय द्या.

Image
  निकालातील चुकीचा फटका बसलेल्या विद्यार्थ्याला न्याय द्या.  कोल्हापुर-शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण केंद्राच्या माध्यमातून बी.कॉम अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाची परीक्षा दिलेल्या एका विद्यार्थ्याच्या निकालात विद्यापीठाकडून चूक झाली आहे. या चुकीचा फटका बसलेल्या विद्यार्थ्याला विद्यापीठाने योग्य तो न्याय द्यावा, अशी मागणी कोल्हापूर शहर विद्यार्थी काँग्रेसने(एनएसयुआय) आज केली.त्याबाबतचे निवेदन एनएसयुआय'च्या शिष्टमंडळाने परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.आदित्य जाधव यांना दिले. या संबंधित विद्यार्थ्यावर त्याच्या कुटुंबाची जबाबदारी आहे त्याच्या करिअरचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे याबाबत विद्यापीठ प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे. या विद्यार्थ्याला विद्यापीठ कसा न्याय देणाऱ्याची माहिती आम्हाला द्यावी. निकालात अशा चुका वारंवार होऊ नयेत,यासाठी दोषींवर त्वरित कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा एनएसयुआय'चे अध्यक्ष अक्षय शेळके यांनी दिला. संबंधित विद्यार्थ्याला न्याय दिला जाईल असे डॉ.जाधव यांनी सांगितले. यावेळी मुबीन मुश्रीफ, अथर्व चौगुले,यश शिर्के, आसिफ

सचिन जंगम यांची शाळा व्यवस्थापन समिती ओझरे -अध्यक्षपदी निवड.

Image
  सचिन जंगम यांची शाळा व्यवस्थापन समिती ओझरे -अध्यक्षपदी निवड.  भणंग :- सोमवार दिनांक 28 ऑगस्ट 2023 रोजी  पार पडलेल्या ओझरे शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती सभेमध्ये सर्वानुमते श्री सचिन शांताराम जंगम यांची बिनविरोध नवनियुक्त अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. स्वच्छ सुंदर गुणवत्ता व पूर्ण शाळा, राष्ट्रीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार, जिल्हास्तरीय बालनाट्य स्पर्धा, आयएसओ शाळा ,विविध सांस्कृतिक स्पर्धा यामध्ये सदस्यपदी काम करत असताना सचिन जंगम यांनी मोलाची कामगिरी केलेली आहे. आज अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर यापुढे देखील शालेय उन्नतीसाठी  काम करणार असल्याचे तसेच शाळेच्या विविध अडचणी सोडवण्यामध्ये प्रामुख्याने सर्व शाळा व्यवस्थापन समिती  लक्ष देणार असल्याचे सचिन जंगम यांनी सांगितले. आजच्या या सभेसाठी अध्यक्ष दत्तात्रय ज्ञानदेव लकडे, उपाध्यक्ष-दर्शना सचिन कदम, माजी अध्यक्ष-विवेक मर्ढेकर, निलेश जवळ,जोगेंद्र मर्ढेकर,माजी ग्रामपंचायत सदस्य-शिल्पाताई सावंत,अर्जुन मोरे,  पूजा सरडे, रेश्माताई मर्ढेकर,आरती चव्हाण,अर्चना जंगम मुख्याध्यापक बळवंत पाडळे उपशिक्षक का संगीता मस्के मॅडम नेहा जाधव मॅडम अण्णासाहेब द

पोखले (ता.पन्हाळा) - येथे विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या शुभहस्ते संपन्न.

Image
  पोखले (ता.पन्हाळा) - येथे विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या शुभहस्ते संपन्न. जलजीवन मिशन योजना करणे - २ कोटी २० लाख ४५ हजार,तांडा वस्ती अंतर्गत धनगर वस्ती व दलीत वस्तीमध्ये सुधारणा करणे - ४ लाख,गावाअंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण व गटर्स - २२ लाख तसेच ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोगातून पूर्ण झालेली कामे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत हरिजनवस्ती टाकी ते साखरवाडी पाणीपुरवठा करणे - २ लाख ९५ हजार,घन कचरा व्यवस्थापन बांधकाम करणे - ८४ हजार,शिलालेख बांधकाम करणे - ३५ हजार,गावाअंतर्गत रस्ते करणे - ३ लाख,महादेव मंदिर हॉल बांधणे - १० लाख,प्राथमिक शाळेस पत्रा घालणे - ८ लाख तसेच ग्रामपंचायतीच्या १५ व्या वित्त आयोगातून पूर्ण झालेली कामे उपकेंद्रास साहित्य देणे - २ लाख ५० हजार,प्राथमिक शाळा शौचालय बांधणे - १ लाख,खुले व्यासपीठ बांधणे - १ लाख ६० हजार,अंगणवाडी साहित्य पुरविणे - ८२ हजार,RO प्लॉन्ट बसविणे - ४ लाख ९५ हजार,साखरवाडी सार्वजनिक शौचालय बांधणे - ३ लाख,पाणीपुरवठा नळ दुरुस्ती - १ लाख,पाण्याच्या टाकीला कंपाऊंड करणे - १ लाख ५१ हजार,ग्रा.पं.कार्यालय शेजारी बं

आरटीआयच्या नावाने फेरीवाल्यांवर दादागिरी. माहितीच्या अधिकाराचा गैरवापर करण्याचे प्रमाण वाढले.

Image
  आरटीआयच्या नावाने फेरीवाल्यांवर दादागिरी. माहितीच्या अधिकाराचा गैरवापर करण्याचे प्रमाण वाढले. नवी मुंबई :-"पहिले आमचा विचार करा नाहीतर धंदे चालू देणार नाही" असे गोरगरीब फेरीवाल्यांना धमकावून त्यांच्याकडून जोरजबरदस्तीने चिरीमिरी घेणाऱ्या तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांनी हैदोस घातला आहे.  अरुण गुप्ता व गोविंद साळुंखे आरटीआयच्या नावाने तुर्भे 'डी' विभागातील अधिकाऱ्यांना अर्ज करून माहिती घेत आहेत. माहीती प्राप्त होताच हे दोघे एपीएमसी मार्केट येथील फेरीवाल्यांना दमदाटी करत असून त्यांच्याकडून पैसे वसुली करण्याचे काम करीत आहेत. तसेच कारवाई न  केल्यास महानगरपालिका अधिकाऱ्यांना संपर्क साधतात व स्थानिक नेत्यांचे नाव घेऊन फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी दबाव तंत्राचा वापर करीत आहेत.  अशा आरटीआयच्या गैरवापर करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांवर त्वरित कायदेशीर कारवाई करण्यात यावी या आशयाचे पत्र 'भारतीय  अपराध अनुसंधान जांच एजन्सी' चे पदाधिकारी प्रदीप कणसे यांनी पालिका आयुक्तांना दिले असून त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

खेळात सर्वोत्तम कामगिरी करण्यात आहार हा महत्वाचा घटक असतो "आयर्नमन डॉ. सुधीर पवार.

Image
  खेळात सर्वोत्तम कामगिरी करण्यात आहार हा महत्वाचा घटक असतो "आयर्नमन डॉ. सुधीर पवार.     " कोणत्याही खेळाडूने सर्वोत्तम कामगिरी करण्यात सर्वात महत्वाचा घटक असतो तो म्हणजे आहार.कारण योग्य आहारावरच खेळाडूंचे वजन,शरीरातील चरबीचे,पाण्याचे प्रमाण,स्नायूची,श्वसनाची,आणि हृदयाची कार्यक्षमता आणि ताकत अवलंबून असते." असे मत सातारा जिल्ह्याचे पहिले आयर्नमन मेढा येथील सुप्रसिद्ध डॉ.सुधीर पवार यांनी व्यक्त केले.     जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित ,आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांचे जयंतीनिमित्त  राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला.त्यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी होते.         " खेळाडूंचे आरोग्य आणि आहार " या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले  की, " चांगल्या आरोग्यासाठी आहार महत्वाचा असतो.तुम्ही जर खेळाडू असाल तर तुम्ही आपल्या आहाराबाबत खूप जागरूक असणे आवश्यक आहे.चांगल्या आहारामुळे तुमची खेळातील कामगिरी सुध

चिमगाव येथे विविध विकास कामांचा शुभारंभ...

Image
  चिमगाव येथे विविध विकास कामांचा शुभारंभ... --------------------------------------------------------------------------- --------------------------------------------------------------------------- चिमगाव, (ता. कागल) महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री नामदार हसनसो मुश्रीफ साहेब यांच्या प्रयत्नातून विठ्ठल मंदिर महाप्रसादाचे हॉलचे पायाभरणी व  दोन अंगणवाडी पायाभरणी शुभारंभ सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे चेअरमन व गोकुळ दूध संघाचे संचालक श्री.नविद मुश्रीफ साहेब यांच्या शुभहस्ते हस्ते संपन्न झाले. या शुभारंभ प्रसंगी नविद मुश्रीफ म्हणाले, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी जे जे काही करता येईल, ते करण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे. भविष्यात सरपंच आणि सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून जी विकासाची अपूर्ण राहिलेली कामे आहेत, ते पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.           यावेळी सरपंच दिपक आंगज, उपसरपंच आनंदा चौगले, सागर भोई, आनंदा करडे, कविता करडे, संगिता फराकटे, अस्मिता चौगले, संजय एकल, सोनाली मांगले, रेश्मा नाईक, विकास पाटील, रणजित सू

महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपाध्यक्षश्री.युवराज(बाबा)काटकर व तालुका अध्यक्ष श्री.धनाजी आगलावे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांना निवेदन देण्यात आले.

Image
 महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपाध्यक्षश्री.युवराज(बाबा)काटकर व तालुका अध्यक्ष श्री.धनाजी आगलावे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांना निवेदन देण्यात आले. -------------------------------------------------------------------------------- -------------------------------------------------------------------------------- शाहूवाडी:आज दि.२९.८.२०२३ रोजी मलकापूर-मुंबई -मलकापूर ट्रॅव्हल्स मालक व चालक यांचे बेकायदेशीर तिकीट दर वाढ व रिटर्न ट्रॅव्हल्स सेवा न करणे संदर्भात माननीय पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र सावंत्रे साहेब यांना निवेदन देण्यात आले. निव्वळ चाकरमानी जनतेला लुटण्याच्या उद्देशाने केलेल्या दरवाढीचा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे जाहीर निषेध करत आहोत सदर प्रवासी वाहतूक संघटनेने येत्या दोन दिवसात चालू तिकीट दरात गणेश उत्सव काळामध्ये प्रवासी भाडे कायम करून व तिकीट दरवाढ थांबवून बुकिंग सुरु न केलेस शुक्रवार दिनांक १.९.२०२३ पासून मलकापूर मुंबई करिता जाणाऱ्या येणाऱ्या सर्व प्रवासी ट्रॅव्हल्स महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अडवल्या जातील अशा प्रकारचा इशारा महा

बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगल्याप्रकरणी अक्षय भोसले यांचेवर गुन्हा दाखल.

Image
 बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगल्याप्रकरणी  अक्षय भोसले यांचेवर गुन्हा दाखल.  दिनांक 27 ऑगस्ट रोजी  मोळाचा ओढा परिसरात निकी बंटी हाॅटेल समोर सातारा येथे बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगल्याप्रकरणी अक्षय भोसले,वय 32, राहणार गणेश काॅलनी तामजाई नगर सातारा यास स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस आनंद चव्हाण यांनी ताब्यात घेतले. व‌ गुन्हा भारतीय हत्यार अधिनियम कलम 3, ( 1,25) अन्वये गुन्हा दाखल केला असून अक्षय भोसले याचेकडुन 65000 रुपये किंमतीची पिस्तुल जप्त केली. पुढील तपास पीएसआय फरांदे करीत आहेत.

शिधा आनंदाचा ' सप्टेंबरमध्ये होणार वितरित शंभर रुपयात आनंदाचा शिधा वाटप योजना.

Image
  शिधा आनंदाचा ' सप्टेंबरमध्ये होणार वितरित   शंभर रुपयात आनंदाचा शिधा वाटप योजना.   लावंघर - गौरी-गणपती आणि दिवाळी सणानिमित्त सरकारने राशन कार्ड धारकांना खास भेट दिली आहे .   अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थीच्या पात्र शिधापत्रिका धारकांना गौरी - गणपती उत्सव व  दिवाळी सणानिमित्त  चार जिन्नस असलेला आनंदाचा शिधा येत्या १ ते ३० सप्टेंबर या कालावधीत हा शिधा वितरीत करण्यात येणार आहे.   प्रति शिधापत्रिका १संच, ज्यामध्ये १ किलो रवा ,चनाडाळ,साखर, व १लिटर खाद्यतेल असे एकूण चार जिन्नस असलेला संच शंभर रुपये दराने रास्तभाव दुकानातून वितरीत करण्यात येणार आहे.

नुकुल दादा देशमुखच्या रुपात मिळाला हक्काचा भाऊ.

Image
  नुकुल दादा देशमुखच्या रुपात मिळाला हक्काचा भाऊ. आशा वर्कर,मदतनीस, सेविका यांनी केल्या भावना व्यक्त. रिसोड : कृतज्ञता सोहळ्याच्या माध्यमातून महिलांना एक हक्काचा घर,व हक्काच भाउ मिळाला,शासन व प्रशासन स्तरावर आशा वर्कर,मदतनीस, सेविका यांच्या कार्याची सहसा कोणी दखल घेत नाही. मनापासून काम करून आपली सेवा प्रदान करणाऱ्या आशा सेविका मदतनीस ह्या नेहमीच अलिप्त असतात. मात्र संत सातारकर महाराज संस्थान मध्ये आयोजित सत्कार सोहळ्यातून कोणीतरी आहे जे अशा महिलांना न्याय मिळवून देणार व तसेच त्यांच्यासाठी झटणार अश्या आशा पल्लवीत झाल्या असल्याच्या सदर सोहळ्यानंतर महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सदर महिलांच्या अनेक प्रश्न आहेत जे शासन दरबारी कुठेतरी अडकून पडलेले आहे. मात्र एडवोकेट नकुल दादा देशमुख यांच्या माध्यमातून आपले प्रश्न शासन दरबारी आता कोणीतरी मांडेल अश्या आशा पल्लवीत झाल्या असल्याच्या आशा वर्कर, अंगनवाडी सेविकांचे म्हणणे आहे.आपले आरोग्य व जीवाची पर्वा न करता गावाची काळजी वाहणाऱ्या अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व मदतनीस कशाचीही पर्वा न करता तुटपुंज्या मानधनात इमान इतबारे आपले आपले कर्तव्य बजावत

वकृत्व स्पर्धा अतिशय जोरदार पद्धतीने पार.

Image
  वकृत्व स्पर्धा अतिशय जोरदार पद्धतीने पार. कोल्हापूर- युवासेना मार्फत सडेतोड युवक बोलणार महाराष्ट्र ऐकणार ही सपर्धा अतिशय उत्साहात पार पडली. स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना ठाकरे गट जिल्हा प्रमुख संजय पवार,विजय देवणे, मुरलीधर जाधव,युवासेना विस्तारक डॉ.सतीश नर्सिंग,युवासेना जिल्हा युवा अधिकारी मनजीत माने,शहर प्रमुख सुनील मोदी,हर्षल सुर्वे यांच्या हस्ते संपन्न झाले. या स्पर्धेसाठी पंच म्हणून शिवाजी विद्यापीठ अधिसभा सदस्य श्वेता परूळेकर व निशांत गोंधळी यांनी काम पाहिले. या स्पर्धेसाठी अडतीस युवक युवतींनी सहभाग नोंदवला. अंतिम फेरी मुंबई मधे होईल असे युवासेनेच्या शिष्टमंडळाकडून सांगण्यात आले. यावेळी माजी आमदार सुजित मिणचेकर,तसेच युवासेना सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

मौजे वडगाव च्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी मधुकर अकिवाटे यांची बिनविरोध निवड.

Image
 मौजे वडगाव च्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी मधुकर अकिवाटे यांची बिनविरोध निवड. ---------------------------------------------------------------------------- ---------------------------------------------------------------------------- मौजे वडगाव, ता. हातकणंगले येथील महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी त्रिमूर्ती पतसंस्थेचे चेअरमन,कामधेनू दूध संस्था व दत्त विकास सोसायटी चे माजी संचालक,यात्रा कमिटी सदस्य श्री मधुकर अकिवाटे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामसभेच्या विषय पत्रिकेवरील विषय क्रं 9 महात्मा गांधी तंटामुक्ती समिती गठित करणे या विषयावर चर्चा होऊन मधुकर अकिवाटे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सूचक म्हणून माजी सरपंच व जय शिवराय ग्रामविकास आघाडी चे प्रमुख सतीश चौगुले तर गणेश पाणीपुरवठा संस्थेचे व्हाईस चेअरमन आनंदा जाधव यांनी अनुमोदन दिले. निवडीनंतर सरपंच कस्तुरी पाटील व शिरोली एम आय डी चे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज गिरी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी उपसरपंच सुनिल खारेपाटणे,ग्रामपंचायत सदस्य सुरेश कांबरे,स्वप्निल चौगुले,रघुनाथ ग

सायली फॉउंडेशनच्या आरोग्य शिबिरास चांगला प्रतिसाद...

Image
 सायली फॉउंडेशनच्या आरोग्य शिबिरास चांगला प्रतिसाद... तुर्भे :- नवी मुंबईतील तुर्भेस्टोर येथील आर. पी. आय. (आ )गटाच्या कार्यालयात सायली फॉउंडेशन यांच्या कडून आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात तुर्भे येथील लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. यावेळी रुग्णाची आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिरास उपस्थित ऍड.यशपाल ओहळ,फायज शेख, यांची प्रमुख उपस्थिती होती. सदरील आरोग्य शिबिराचे आयोजन आर. पी. आय. तुर्भे शाखा अध्यक्ष अभिमान जगताप यांनी केले होते. शिबिराला विशेष सहकार्य महिमा ख्रिश्चन फेलोशिप यांचे होते.

पिंपळा येथे आदिवासी माता भगिनी मध्ये गोपाल पाटील राऊत यांचा वाढदिवस साजरा.

Image
 पिंपळा येथे आदिवासी माता भगिनी मध्ये गोपाल पाटील राऊत यांचा वाढदिवस साजरा.   मालेगाव 28 ऑगस्ट तालुक्यातील पिंपळा येथे गोपाल पाटील राऊत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आदिवासी माता-भगिनीमध्ये गोपाल पाटील राऊत यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला माजी पंचायत समिती सदस्य गोपाल पाटील राऊत यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने तालुका मध्ये साजरा होत असून पिंपळा येथे आदिवासी माता-भगिनी मध्ये वाढदिवस साजरा करण्यात आला.  याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच संतोष डंगारे सत्कारमूर्ती गोपाल पाटील राऊत प्रमुख उपस्थिती पंचायत समिती सदस्य जगदेवराव ढंगारे पोलीस पाटील समाधान गुडदे उत्तम देवळे जगदीश गुडदे प्रकाश देवळे कैलास पाटे अशा असंख्य गावकऱ्याची माता-भगिनींची उपस्थिती होती या प्रसंगी प्रास्ताविक समाधान गुडदे यांनी केले असून जगदेव डोंगरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यांनी सांगितले की गोपाल पाटील यांच्यासारखा निस्वार्थ नेता तालुक्यामध्ये कोणताही नसून त्यांनी कुठल्याही स्वार्थापोटी आपल्या गावामध्ये साडे चोळी वाटपाचा कार्यक्रम घेतला नाही डोक्यामध्ये 15 गावांमध्ये पंधराशे चोळीचे वाटप करत आहेत आपले मनोगत व्यक्त

सामाजिक कार्याकमातून लोकप्रबोधनासाठी सार्वजनिक मंडळांनी पुढाकार घ्यावा. स. पो. नि.अर्जुन घोडे पाटील.

Image
 सामाजिक कार्याकमातून  लोकप्रबोधनासाठी सार्वजनिक मंडळांनी पुढाकार घ्यावा. स. पो. नि.अर्जुन घोडे पाटील. सार्वजनिक गणेश उत्सव सोहळा साजरा करताना पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे काही कार्यकर्त्यांच्या अतिउत्साहपणामुळे कायदा आणि सुव्यवस्था भंग होणार नाही याची दक्षता प्रत्येक मंडळांनी घेणे गरजेचे आहे. परिवर्तनशील व पर्यावरण पूरक सामाजिक कार्यक्रमातून लोकप्रबोधनासाठी सार्वजनिक मंडळांनी पुढाकार घ्यावा असे आव्हान गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी केले.  ते गडमुडशिंगी येथे आयोजित केलेल्या शांतता बैठकीत बोलताना म्हणाले.  गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गडमुडशिंगी ग्रामपंचायत आणि  गांधीनगर पोलीस ठाण्याच्या वतीने गडमुडशिंगी येथील गणेश उत्सव मंडळ पदाधिकारी,  लोकप्रतिनिधी यांची बैठक आयोजित केली होती.  पोलिसांनी घालून दिलेल्या नियम आणि अटींचे पालन करून हा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करून प्रत्येक मंडळांनी समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम साजरे करावेत. यावेळी गणेश मंडळानी प्रबोधनात्मक देखावे सादर करणाऱ्या मंडळांना वेळ वाढवून द्यावी, 

करंदी मधील रस्ता अडवणाऱ्यावर कारवाई करून आम्हास न्याय द्या नाहीतर आंदोलन करणार : किरण बगाडे.

Image
 करंदी मधील रस्ता अडवणाऱ्यावर कारवाई करून आम्हास न्याय द्या नाहीतर आंदोलन करणार : किरण बगाडे. -------------------------------------------------------------------------------- -------------------------------------------------------------------------------- मा.तहसिलदार सो व मा.गटविकास अधिकारी पं.समिती मेढा यांना RPI (A) च्या व करंदी ग्रामस्थ यांच्या वतीने निवेदन सादर. मौजे करंदी ता. जावली मधील सर्व्हे नं.42 मध्ये आमच्या गावठाण  हद्दीमध्ये अतिक्रमण व  वाहिवाटीचा रस्ता बंद करत असून आमच्या हद्दीत पत्र्याचे शेड शंकर रावसो शिर्के ,गिरीश शिवाजी भिलारे यांच्यावर कायदेशीर कारवाई करा . उपरोक्त वरील विषयानुसार मौजे करंदी ता.जावली येथील आमच्या अशा सर्व्हे नं.42,43,44, मध्ये आमच्या गावठाण  80 अ,ब,क हद्दीमध्ये अतिक्रमण व  वाहिवाटीचा रस्ता बंद करत असून आमच्यामध्ये संबंधित व्यक्तीने बेकायदेशीर व अनधिकृत रित्या माझी जागा म्हणत पत्र्याचे शेड टाकून आमच्या जागेत अतिक्रमण करून आमच्यावर अन्याय केला आहे सदर व्यक्ती हा आमच्यावर नेहमी दमदाटी करत  असून आमच्यावर नेहमी वादावादी करत असतो असतो त्याच व्यक्तीचे त्या ठ

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आयसीयु मध्ये स्वच्छतेचा बोजवारा.

Image
 सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आयसीयु मध्ये स्वच्छतेचा बोजवारा. सध्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दुर्गंधी पसरली आहे. दररोज हजारो रूग्ण उपचारासाठी येत असतात. नूतन शल्य चिकित्सक डॉ युवराज करपे यांनी स्वच्छतेबाबत ग्वाही दिली होती पण सध्या आयसीयु विभागात तंबाखू, गुटखा, पान खाऊन पिचकाऱ्या मारलेल्या दिसत आहेत. वैद्यकीय निरूपयोगी साहित्य विल्हेवाट लावलेले नाही. शिवाय आयसीयु मध्ये जिकडे तिकडे अस्वच्छता निर्माण झाली आहे.  नेमके स्वच्छता कर्मचारी काम करतात की नाही हा संशोधनाचा विषय आहे.   स्वच्छतागृह व्यवस्थित नसल्याने जिकडे तिकडे दुर्गंधी पसरली आहे. स्वच्छता कर्मचारी यांच्या वर कोणाचेही नियंत्रण नाही.  ठेकेदार ही बाब गांभीर्याने घेत नाहीत. तात्पुरत्या स्वरूपात स्वच्छता केली जाते. नेमके आयसीयु म्हणजे काय असा प्रश्न उपस्थित होतो. रुग्णालयात स्वच्छता वेळेवर न झाल्याने रूग्ण लवकर बरे न होता त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला तर जबाबदार कोण ? स्वच्छता कर्मचारी स्वच्छता ही फारशी गांभीर्याने घेत नाहीत म्हणून शल्य चिकित्सक डॉ युवराज करपे यांनी याबाबत तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे असे नागरिक व  रुग्णांचे म्हणणे आहे

तुर्भे येथे 'रेलवे जागरूकता अभियान' कार्यक्रमाचे आयोजन पोलिसांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.

Image
 तुर्भे येथे 'रेलवे जागरूकता अभियान' कार्यक्रमाचे आयोजन पोलिसांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. नवी मुंबई (तुर्भे ):- नुकताच आरपीएफ पोलिस ठाणे तुर्भे व डॉ. एच. व्ही. सामंत विद्यालय तुर्भे यांच्या सयुंक्त विद्यमाने सामंत विद्यालयात 'रेलवे जागरूकता अभियान' कार्यक्रम आयोजित करण्यात आला.  या कार्यक्रमास माजी नगरसेविका शुभांगी पाटील, आरपीएफ तुर्भे पोलीस निरीक्षक सुनील कुमार यादव, उप निरीक्षक ममता जगमाल, उप निरीक्षक संदीप बारई, सहा उप निरीक्षक आप्पा मांडे, सहा उप निरीक्षक निलेश लोंढे तसेच विद्यालयाच्या उप मुख्याध्यापिका सौ विजया कोळी, पर्यवेक्षक सुनील कोळी सर, जेष्ठ शिक्षक धनगर सर उपस्थित होते. या प्रसंगी शुभांगी पाटील यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना रेल्वे संबंधी माहिती देऊन मार्गदर्शन केले. तसेच आरपीएफ च्या अधिकाऱ्यांनी रेलवे चे नियम व कायदे तसेच विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी या विषयी सखोल मार्गदर्शन केले.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश ठाकुर सर यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी उप मुख्याध्यापिका सौ. विजया कोळी यांनी आरपीएफ पोलीस व उपस्थितांचे आभार मानले.

असे एक रक्षाबंधन.

Image
 असे एक रक्षाबंधन. आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परळी शाळेतील मुलांनी शाळेचे उपक्रम व वैशिष्ट्य असणाऱ्या नाविन्यपूर्ण राख्या बनवल्या. शाळेच्या उपक्रम, गुणवत्ता यांचा प्रसार व्हावा यासाठी राख्यांची मुलांनी गावामध्ये विक्री केली. बहीण भावाच्या अतूट नात्याचा हा सण. समाज आणि शाळा यांचाही असाच अतूट स्नेहभाव राहावा यासाठी शाळेने हा अनोखा उपक्रम राबवला. ग्रामपंचायत सदस्य यांनी ग्रामसभेत भरभरून राख्या खरेदी केल्या व मुलांचा आनंद द्विगुणित केला.

सातारा तहसीलदार राजेश जाधव यांनी केली दोन अपघातग्रस्तांना मदत.

Image
 सातारा तहसीलदार राजेश जाधव यांनी केली दोन अपघातग्रस्तांना मदत. सातारा येथील ग्रेड सेपरेटर मध्ये झालेल्या अपघातातील दोघा जखमींना सातारा तहसीलदार राजेश जाधव यांनी जिल्हा रुग्णालयात उपचार करणेसाठी वेळीच दाखल केल्याने दोघांचे जीव वाचले. सातारा तहसीलदार राजेश जाधव शनिवारी कार्यालयीन सुट्टी असताना ही नेहमीप्रमाणे काम करीत होते. कार्यालयातुन बाहेर पडल्यानंतर गोडोली कडे जाणा-या दिशेने ग्रेड सेपरेटर चया दिशेने ‌ते जात असताना दुचाकी स्वार आणि पादचारी जखमी अवस्थेत व्हिवळत पडले होते. रहदारी कमी असल्याने अपघात झाल्याची कल्पना कुणालाही नव्हती. समोर दोघे जण जखमी अवस्थेत पडल्याचे दिसल्यावर तहसीलदार राजेश जाधव  यांनी त्यांच्या  वाहनचालक  वसंत सपकाळ गाडी थांबवायला लावुन क्षणाचाही  विलंब न लावता जखमीकडे धाव घेतली. अक्षय वसंत सुतार, राहणार संभाजीनगर , सातारा तसेच शिवाजी विष्णू साठे , राहणार एकंबे ‌तालुका कोरेगाव यांना स्वतः उचलून गाडीत घातले आणि जिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करण्यासाठी दाखल केले. त्यावेळी गाडी रक्ताने माखलेली होती. वाहन चालक वसंत सपकाळ यांनीही मदत केली. यावेळी सातारा वाहतूक पोलीस राहुल मो

चैतन्य संस्थेचा ३०वा वर्धापन दिन यशस्वी संघ करवीरच्या वतीने उत्साहाने साजरा.

Image
  चैतन्य संस्थेचा ३०वा वर्धापन दिन यशस्वी संघ करवीरच्या वतीने उत्साहाने साजरा. -------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  कौलव प्रतिनिधी  संदीप कलिकते --------------------------------------   चैतन्य संस्था राजगुरुनगर पुणे या सामाजिक संस्थेचा ३०वा वर्धापन दिन यशस्वी ग्रामीण महिला संघाच्या वतीने क बावडा येथे उत्साहात साजरा करण्यात आला.      ३०वर्षापूर्वी राजगुरुनगर पुणे येथे महिला सबलीकरणासाठी चैतन्य संस्थेची स्थापना मा डॉ सुधाताई कोठारी यांनी सुरेखाताई श्रोत्रीय, कल्पना पंत आणि त्यांच्या इतर सहकार्याच्या मदतीने केली.सुरुवातीला एक रुपया बचत करुन दहा बचत गट स्थापन करून कामाला सुरुवात केली.आज ५राज्यात काम सुरू असून,११हजार ४२०बचतगट असून १लाख १६हजार ६६९महिला काम करीत आहेत.      या संस्थेच्या माध्यमातून राधानगरी आणि करवीर तालुक्यातील ३० गावात २३० बचत गटांची स्थापना करून यशस्वी ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघाची निर्मिती झाली असुन २९००महिला संघासोबत काम करत आहेत.या संघाच्या वतीने क'बावडा येथे बचत गटाच्या वतीने चैतन्य संस्थेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला    सुरुवातीला

रिपब्लिकन सेना व समविचारी संघटनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन.

Image
 रिपब्लिकन सेना व समविचारी संघटनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन. छ शिवाजी महाराज यांची बदनामी करणाऱ्या वर कठोर कारवाई करून त्यांचा मास्टर  माइंड चा शोध घेऊन कारवाई व्हावी त्याचबरोबर याच अनुषंगाने कायदा आणि सुव्यवस्था बिघडून पाहणाऱ्यांच्यावर कठोर कारवाई करावी महामानवांचा आव्हान करणारे सतत वक्तव्य करून समाजामध्ये असंतोष निर्माण करणाऱ्या मनोहर भिडे यांना तातडीने अटक करून कट्टर कारवाई करण्यात यावी आणि कायदा सर्वांसाठी एकच आहे हे शासनाने दाखवून द्यावे या मागणीकरिता जिल्हाधिकाऱ्याला समोर सोमवार दि 28 -8- 2013 रोजी सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे तरी रिपब्लिकन सेनेच्या व समविचारी संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वेळेत आंदोलनास उपस्थित राहावे असे आव्हान रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी केले आहे

प्राथमिक शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार, अद्याप विद्यार्थी पुस्तकांपासून वंचित.

Image
 प्राथमिक शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार, अद्याप विद्यार्थी पुस्तकांपासून वंचित. सातारा जिल्ह्यातील नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होवून तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध झालेली नाहीत. पहिली घटक चाचणी तोंडावर आली असताना पुस्तकांचा पत्ता नसल्याने प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद यांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर पुन्हा एकदा आला आहे. पाठ्यपुस्तके व गणवेश न मिळाल्याने विद्यार्थ्यांसह पालकही नाराज आहेत.  विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा अंतर्गत सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत मोफत पाठ्यपुस्तके देण्याचे धोरण आहे. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था , खाजगी, अनुदानित अशा जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना याचा लाभ दिला जातो. पुस्तकांची मागणी ही प्रत्येक तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी यांनी ऑनलाईन पद्धतीने बालभारती कडे केली होती. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके देण्याचा