Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

शिवजयंती निमित्त शिवज्योत आणण्याची हनुमान उदय मंडळाची पंरपरा कायम!

 शिवजयंती निमित्त शिवज्योत आणण्याची हनुमान उदय मंडळाची पंरपरा कायम!

भणंग : -  जवळ- जवळ ४५ वर्षे शिव जयंती निमित्त शिव ज्योत आणण्याचे परंपरा हनुमान मंडळांनी कायम ठेवली आहे

छत्रपती. श्री. शिवाजी महाराजांनी तोरणा गडावर स्वराज्याचे तोरण बांधले , स्वराज्य निर्माण केले

त्याच धरतीवर १९७५ ते १९७६  च्या दरम्यान तोरणा किल्ल्या वरूनच प्रथम शिव ज्योत आणण्यास प्रारंभ केला .

प्रतापगड , सिंहगड , रायरेश्वर , अजिंक्यतारा , सज्जनगड  , तुळजापुर , वर्धनगड ' जंजिरा , अश्या अनेक गडावरून शिवज्योत आणून  परंपरागत शिव जयंती उत्सव साजरा केला जातो . त्या काळी ही वेशभूषा व ऐतिहासिक मराठी चित्रपट दाखवले जायचे . तोच आनंद , तोच उत्साह तरुणांचे सळसळते रक्त '  , हनुमान उदय मंडळाचे  कार्यकर्त्यां मध्ये आजही सळसळत आहे 

देवगिरी [ छत्रपती संभाजी नगर ] ते भणंग [ राजधानी सातारा ] तीन रात्र दोन दिवस  रात्र धावत अंतर कापून  देवगिरी ते भणंग शिवज्योतीचा प्रवास  केला .   दि . २२ / ०४ / २०२३ रोजी शिवजयंती दिवशी   भणंग मध्ये शिवज्योत दाखल झाली . गावातील महिला वर्गानी शिव ज्योतीचे  पंचाआरती  ने ओवाळून  जय घोषात स्वागत केले ,मुलींनी वेशभूषा करून कार्यक्रमाला रंगत आणली . दिवसभर  स्पिकर वर शिव शाहीर बाबासाहेब पुरंदरे याचे पोवाडे लावून वातावरण शिवमय केले . संध्याकाळी पालखीतून छ , शिवाजी महाराजांची  व शिव ज्योतीची  ढोल - ताशांच्या गजरात आणि छत्रपतींचा भगवा हातात घेवून एका तालात , गजरात तरुण वर्गानी तन -मन - धन एकत्र करून नाचत होते . संपुर्ण गावातून मिरवणूक झाल्या नंतर , सरसेनापती हंबीरराव  मोहिते हा ऐतिहासिक मराठी चित्रपट दाखविण्यात आला आणि शिवकाळातल्या  ऐतिहासिक क्षणांना   उजाळा मिळाला .

छत्रपती.श्री.शिवाजी महाराज कि जय

जय शिवाजी जय भवानी !

Post a Comment

0 Comments