Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सर्वसामान्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे कर्तव्यनिष्ठ अधिकारी डी वाय एस पी रामेश्वर वैंजणे.अल्पावधीतच लोकप्रिय शिखरावर.


सर्वसामान्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे कर्तव्यनिष्ठ अधिकारी डी वाय एस पी रामेश्वर वैंजणे.अल्पावधीतच लोकप्रिय शिखरावर.

-------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र

जयसिंगपूर: प्रतिनिधी

नामदेव भोसले

-------------------------------

महाराष्ट्राच्या स्वाभिमानी मातीमधल्या लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील बेलूर या छोट्याश्या गावी सर्वसामान्य शेतकरी कुटूंबात जन्मलेले रामेश्वर वैंजणे यांनी पोलिस दलात आपल्या कार्याचा अगळा-वेगळा ठसा जनसामान्यांच्या मनात उमठविला आहे. गोर-गरिबांची कामे तातडीने निस्वार्थी भावनेने मार्गी लावण्यात व त्यांना न्याय देण्यात या कर्तव्य कठोर लातूरच्या भूमी पूत्राचा मोठा हात  आहे.आणि त्यातूनच होरपळून निघाल्यानंतर एक लढवैय्या व्यक्तीमत्व तयार झाले.पोलिस दलाचा अभिमान असल्याने महाराष्ट्र पोलिस दलात कर्तव्य बजावण्याची संधीच ते शोधत होते. आणि अखेर २०१४ साली थेट पोलिस उपअधिक्षक पदाला त्यांनी गवसणी घातली. आणि यशाचा मार्ग सापडला. प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून त्यांनी नाशिक ग्रामीण येथे काम केले. त्यानंतर बुलढाणा, हिंगोली शहर, जयसिंगपूर,  हिंगोली ग्रामीण येथील कित्येक किचकट गुन्ह्यांचा छडा लावण्यात त्यांना यश आले. सामान्य जनतेबरोबरच अधिकारी व कर्मचारी यांना आपलासा वाटणारा हा खमक्या

अधिकारी  मनाला भावून जातो.पोलिस खात्यात नोकरी करता करता मन अगदी निपूर बनते. हि समाज प्रतिक्रीया अंगवळणी पडते म्हणा, किंवा कर्तव्यपूर्तीसाठी कठोरता अंगी बाणावी लागणे या अपरिहार्यतेमुळे म्हणा, खाकीतला माणूस नेहमीच दया माया नसलेला निशूर म्हणून बदनाम होत राहिला आहे. अर्थत पोलिस खात्यात नोकरी करताना बेलूरच्या जिल्हापरिषद शाळेत प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण करीत उच्चपदस्थ होण्याचे स्वप्न उराशी बाळगून दैनंदिन जीवनात आयुष्याला कलाटणी देण्यासाठी काही नियम अंगी बाळगले. विज्ञान शाखेतून १२ पर्यंतचे शिक्षण   डि.एड. पूर्ण केले. त्या नंतर मुक्त विद्यापीठातून इतिहास व इंग्रजी या विषयातून पदवी प्राप्त केली. आयुष्यातील संघर्षांचा प्रवास जाणून घेताना बरेच चांगले-वाईट अनुभव आले

आणि त्यातूनच होरपळून निघाल्यानंतर एक लढवैय्या व्यक्तीमत्व तयार झाले.पोलिस दलाचा अभिमान असल्याने महाराष्ट्र पोलिस दलात कर्तव्य बजावण्याची संधीच ते शोधत होते. आणि अखेर २०१४ साली थेट पोलिस उपअधिक्षक पदाला त्यांनी गवसणी घातली. आणि यशाचा मार्ग सापडला. प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून त्यांनी नाशिक ग्रामीण येथे काम केले. त्यानंतर बुलढाणा, हिंगोली शहर, हिंगोली ग्रामीण येथील कित्येक किचकट गुन्ह्यांचा छडा लावण्यात त्यांना यश आले. सामान्य जनतेबरोबरच अधिकारी व कर्मचारी यांना आपलासा वाटणारा हा खमक्या अधिकारी अपसूकच मनाला भावून जातो.पोलिस खात्यात नोकरी करता करता मन अगदी निपूर बनते. हि समाज प्रतिक्रीया अंगवळणी पडते म्हणा, किंवा कर्तव्यपूर्तीसाठी कठोरता अंगी बाणावी लागणे या अपरिहार्यतेमुळे म्हणा, खाकीतला माणूस नेहमीच दया माया नसलेला निशूर म्हणून बदनाम होत राहिला आहे.अर्थत या बदनामी पलिकडे खाकीच्या आत असलेल्या  हाडामासांचा गोळा तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसाप्रमाणेच असतो, त्याला सामान्य त्यातलंच एक व्यक्तीमत्व. माणसाला असते तसेच जीवंत मन असते, भावना असतात.

पोलिस खात्यात काम करणारा अधिकारी असो, नाहीतर कर्मचारी धड बोलत नाही. त्यांना अदबीने बोलताच येत नाही. फिर्याद, जबाब आरोपपत्र लिहण्यापलिकडे पेन कागदाशी त्यांचा संबंध नाही. त्यांना लिहीताच येत नाही, असा एक समज समाज मनावर खोलवर रुतला आहे. एखादं दूसरा अपवाद असू शकतो. पण एकजात वर्दीवाले ऐवढे निष्ठुर, निरस असतात हा खोडसाळ समज अनेक पोलिस कर्मचारी अधिकाऱ्यांना वारंवार कृतीने खोडून काढला आहे. जयसिंगपूर उपविभागीय पोलिस अधिकारी  कार्यरत असलेले डीवायएसपी रामेश्वर वैंजणे हे त्यांच्या लोकाभिमुख, कर्तव्यकठोर कार्यपद्धतीने प्रचंड लोकप्रिय झाले असून एरवी पोलीस ठाण्याची पायरी चढण्यास घाबरणारे सर्वसामान्य लोक मोठ्या विश्वासाने त्यांच्या समस्या घेऊन येताना दिसू लागले आहेत.जयसिंगपुर उपविभागीय पोलिस अधिकारी    सूत्रे हाती घेतल्यापासून वैंजणे यांनी त्यांच्या हद्दीतील पोलिस ठाण्याचा कायापालट केला व पोलीस आणि सामान्य जनता यांच्यात विश्वासपूर्ण संवाद निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे दिसून आले। अत्यंत मत्सद्देगिरीने त्यांनी कारभार करण्यावर भर दिलेला दिसून येतो. सामान्य लोकांमध्ये कायद्याचे राज्य ही संकल्पना अधिक दृढ करण्यासाठी नागरिकांना वेळा काळाचे कुठलीही बंधने घालतात थेट भेटण्याची कार्यपद्धती शहरवासीयांना  गोष्टी भावली नसेल तर नवल.कार्यक्षेत्रात घडलेल्या प्रत्येक घटनेच्या ठिकाणी त्वरित धाव घेऊन स्वतः आवर्जून उपस्थित राहणारे तसेच प्रत्येकांच्या सुख-दुःखात धावून जाणारा अवलिया म्हणतो . त्यांच्या कार्यपद्धतीची संपूर्ण तालुक्यात आदरपूर्ण चर्चा होत आहे. 24 तास कायदा व सुव्यवस्था राखण्यात बरोबरच जनतेशी त्यांनी जोडलेले नाते हे कधी विसरू शकत नसल्याचे      शहरवासीय  बोलतात.शहरातमध्ये कुठलेही सामाजिक कार्यक्रम असेल तर त्या ठिकाणी जाऊन तेथील जनतेला संबोधित करत असतात कायद्याविषयी वेळोवेळी माहिती देऊन जागरूकता निर्माण करताना दिसून आले आहे  .हद्दीत घडणारी कुठलीही लहान मोठी घडामोड डिवायएसपी रामेश्वर वैंजणे यांच्या प्रत्येक गोष्टीवर, प्रत्येक घडामोडीवर ते बारीक लक्ष ठेवून असतात. य. यांच्या कार्यपद्धती  शहरात आसपास भागात खऱ्या अर्थाने सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीद सफल होताना दिसून येते जयसिंगपूरचे  उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैंजणे हे त्यातलंच एक व्यक्तीमत्व.पोलिस खात्यात काम करताना मन कठोर होतेच, नव्हे तर ते कठोर करावेच लागते.  कल्पनेपलिकडचे सत्य शोधून काढण्याची बाणलेली सवय कळत-नकळत वर्दीच्या आत असलेल्या माणसाचे हृदय आणि मेंदू या दोन्ही यंत्रणांना चालना देते. आणि खेळता खेळता चिमुकल्यांच्या हातून किल्यांची सुंदर प्रतिकृती तयार व्हावी इतक्या अलगदपणे साहित्याची  निर्मिती होते. डीवायएसपी रामेश्वर वैंजणे यांचा प्रवासही याच वाटेवर सुरू आहे.

आयुष्याच्या रंगमंचावर विधात्याने दिलेली वेगळी भूमिका साकारताना अंगावर पडलेली जबाबदारी, वाहून घ्यावे लागणारे कठोर निर्णय, कर्तव्यपूर्तीची अपरिहार्यता असते. तरीही एका बाजूला कर्तव्याला न्याय देत असताना ज्या समाजाने घडविले, शीरावर असलेली जबाबदारी पार पाडण्या इतपत समर्थ बनविले, त्यासमाजा प्रती आपण देणं लागतो. हा भाव कायम मनात जागृत ठेवणारे, अनेक चेहरे पोलिस दलात कार्यरत आहेत. पोलिस खात्याचा अभिमान असलेल्या या चेहऱ्यांमध्ये जयसिंगपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैंजणे या कर्तव्य दक्ष अधिकान्याचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.

Post a Comment

0 Comments