Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

बिहार राज्याप्रमाणे राज्यातील इतर मागासवर्गीयांची स्वतंत्र जातीनिहाय जनगणना करावी.

 बिहार राज्याप्रमाणे राज्यातील इतर मागासवर्गीयांची स्वतंत्र जातीनिहाय जनगणना करावी.

---------------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र

बार्शी प्रतिनिधी

जोतिराम कुंभार

---------------------------------------------

बार्शी - नुकतीच बिहार मध्ये  स्वतंत्रपणे जातनिहाय जनगणना सुरु झाली आहे. तामिळनाडू, छत्तीसगड आणि इतर अनेक राज्यांनी सुद्धा ओबीसी जनगणना केल्या असून त्यांच्या राज्याच्या विकासासाठी त्यांचा उपयोग झालेला आहे. महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करण्याबाबतची विविध ओबीसी संघटनांची गेल्या कित्येक वर्षांपासूनची मागणी प्रलंबित आहे. जनगणना हा विषय केंद्र शासनाशी संबंधित आहे. मात्र इतर मागासवर्गाची स्वतंत्र जनगणना करण्यासाठी केंद्र सरकारने असमर्थता व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्य शासनाने बिहार सरकारप्रमाणे ओबीसींची स्वतंत्र जनगणना करावी

देशातील अनुसुचित जाती व जमातींची  जातवार जनगणना करून दीडशे वर्षे होत आलेली आहे. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने फक्त अनुसुचित जाती व जमाती यांची जातनिहाय तर इतर सर्वांची एकत्रित गणना करण्याचे धोरण स्विकारले. यातुन मागासवर्गीय ओबीसी वंचित राहिले. सन १९९४ साली केंद्र सरकारने नियुक्त  केलेल्या  राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने ओबीसी जनगणना कशी आवश्यक आहे ते सरकारला तिसऱ्यादा पटवून दिले. सन २०१० च्या ५ मे ला संसदेत राष्ट्रवादीचे नाशिकचे तत्कालीन संसद सदस्य समीर भुजबळ, स्व.गोपीनाथराव मुंडे यांचेसह १०० खासदारांनी ओबीसी जनगणनेचा ठराव केला. त्यासाठी  सर्वपक्षीय प्रयत्न केले होते.  त्यातुन २०११ ते २०१४ मध्ये केंद्राने सामाजिक व आर्थिक जातगणना (SECC 2011) केली. मात्र त्याची आकडेवारी राज्यांना दिली नाही.

देशात सन २०२१ सालच्या नियमित जनगनणेचे काम अद्याप व्हायचे आहे. त्यात ही जातनिहाय गणना करावी अशी आमची सातत्याने मागणी   आहे. तरी, बिहारप्रमाणेच महाराष्ट्र शासनाने इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग यांची जनगणना करावी अशी राष्ट्रीय ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश यांचेवतीने राज्याचे प्रदेश प्रसिद्धीप्रमुख श्री जोतीराम कुंभार यांच्या नेतृत्वाखाली उस्मानाबाद चे मा.तहसिलदार गणेशी माळी साहेब यांना निवेदन देण्यात आले.यावेळी उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष सचिन चौधरी, तालुका अध्यक्ष राजेंद्र कुचेकर, जिल्हा अध्यक्ष ग्रामिण महादेव खराडे, जिल्हा उपाध्यक्ष दिपक चौरे, जिल्हा संपर्कप्रमुख उमाकांत गुडाप्पे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments