Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हमीभाव द्या .

 शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हमीभाव द्या .


-------------------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
गणेश चंद्रशेखर
--------------------------------------------------------

सलग दोन महिन्यापासून पाऊस चालू असल्यामुळे शेतकऱ्यांचे बऱ्याच प्रमाणात नुकसान झाले आहे तरी शेतकऱ्यांना हमीभाव 7000 ते 8000  हजार प्रमाणे प्रति किटल  मिळाला पाहिजे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव गणेश चंद्रशेखर यांनी  केली आहे .

शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे   असे म्हटले जाते परंतु आजच्या शेतकऱ्यावर स्वतःचा परिवार कसा पोहोचायचा हा खूप मोठा गंभीर प्रश्न त्या शेतकऱ्याच्या समोर उभा राहिलेला आहे कारण जो काही मल शेतकऱ्यांच्या घरी आलेला आहे त्या मालापेक्षा जास्त खर्च शेतकऱ्यांना  करावा लागला लावलेला खर्चापेक्षाही कमी माळ झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यावर खूप मोठे संकट उभे राहिले आहे तसेच वाढत्या  महागाईला सुद्धा शेतकऱ्यांना तोंड द्यावे प्रत्येक गोष्टीची किंमत ही वाढत आहे परंतु सोयाबीनचा किंवा शेतकऱ्याच्या मालाला कोणीतरी किंमत वाढून मिळत नाही त्यामुळे जगाचा पोशिंदा बळीराजा हा खूप हवालदार झालेला आहे शेतकऱ्याचा मल घरी यायला सुरुवात झाली की लगेचच त्या  त्या मालाची किंमत भाव घसरायला लागते व अर्ध्यापेक्षा कमी होऊन बसतो म्हणून  याबाबत शासनाने गंभीर्याने विचार करून शेतकऱ्यांना  भाव देण्यायावा असे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव गणेश चंद्रशेखर यांनी मागणी केली आहे..

यंदाही आम्हा शेतकऱ्यांच्या हेच पदरात पडले. यंदा नुकसानीमुळे उत्पादन 60  ते 70 टक्क्यांच्या आत आले. खर्चही निघाला नाही. त्यामुळे यंदाचा दिवाळी सण उधारी आणि उसनवारीवर करावा लागनार आहे 

Post a Comment

0 Comments