Posts

निधि कमी पडू देणार नाही - ना. अशोक उईके.

Image
  निधि कमी पडू देणार नाही - ना. अशोक उईके. ---------------------------------------  चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी  मंगेश तिखट ---------------------------------------  पालकमंत्री डॉ. अशोक उईके म्हणाले आदिवासी समाजाच्या लोककला आणि संस्कृतीचा व्यापक दृष्टिकोन ठेवून विशेष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. हा समाज देव, धर्म आणि संस्कृतीचे पालन करणारा आहे.कोरपना येथील लोककला आणि संस्कृतीचे दर्शन वाखाणण्याजोगे आहे. आदिवासी समाजाची समृद्ध आणि आदर्श संस्कृती आहे.चंद्रपूर जिल्ह्याचा पालकमंत्री आणि आदिवासी विकास विभागाचा मंत्री म्हणून या आदिवासीबहुल भागाला निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही, पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली.

आदिवासी सांस्‍कृतिक महोत्‍सव. कोरपना तेथे संपन्न.

Image
आदिवासी सांस्‍कृतिक महोत्‍सव. कोरपना तेथे संपन्न. -----------------------------------  चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी  मंगेश तिखट ------------------------------------ राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आणि आदिवासी विकास विभागाच्या सहकार्याने काल दि. ३१ मार्च रोजी कोरपना येथे भव्य आदिवासी लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.  कोरपना शहरात पहिल्यांदाच झालेल्या या ऐतिहासिक अशा कार्यक्रमाला राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ना. ॲड. आशिषजी शेलार, राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. प्रा. डॉ. अशोक उईके आणि राज्याचे माजी मंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती होती.  माझ्या मतदार संघातील कोरपना तालुका हा आदिवासी बहुल आहे. या मतदारसंघात आदिवासी बांधवांच्या परंपरागत लोककलेला व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम महत्वपूर्ण ठरला. राजुरा विधानसभेतील सर्वाधिक पेसा ग्रामपंचायती असणाऱ्या कोरपना तालुक्याच्या विकासासाठी पालकमंत्री ना. अशोकजी उईके हे अग्रणी राहून सहकार्य करतील तर शहरात अत्याधुनिक सुविधायुक्त सांस्कृतिक सभागृह व नजिकच्या म...

दि. 1 एप्रिल 2025.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या निर्देशांमुळे.

Image
 दि. 1 एप्रिल 2025.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या निर्देशांमुळे. --------------------------------- कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी शशिकांत कुंभार  ---------------------------------- कोल्हापूरात ‘आयटीहब’ उभारण्याचा मार्ग मोकळा. *शेंडापार्कच्या ‘आयटीहब’ला कृषी विद्यापीठाची 34 हेक्टर जागा घेण्याच्या बदल्यात* *विद्यापीठाला देण्यासाठी शेतीयोग्य 60 ते 100 हेक्टर जागेचा शोध दहा दिवसात घ्या* *-- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश* *कृषी विद्यापीठाला शेतीयोग्य, सुविधायुक्त पर्यायी जागा देण्यासाठी* *कागल, पन्हाळा राधानगरी आणि हातकणंगले तालुक्यांना प्राधान्य* *--उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय* मुंबई, दि. 1 :- कोल्हापूरच्या शेंडापार्क येथे ‘आयटीहब’ उभारण्यासाठी कृषी विद्यापीठाची 34 हेक्टर जागा हस्तांतरीत करण्यात येणार असून कृषी विद्यापीठाला शेती, शिक्षण, संशोधन आदी कार्यासाठी पर्यायी जागा म्हणून कागल, पन्हाळा, हातकणंगले, राधानगरी तालुक्यातील 60 ते 100 हेक्टर एकत्रित जागेचा शोध घेण्यात यावा. येत्या दहा दिवसात कृषी विद्यापीठाच्या सहमतीने पर्यायी जागा अंति...

अक्षर मानव अमरावतीच्या जिल्हाध्यक्षपदी भारत मलवार यांची नियुक्ती.

Image
  अक्षर मानव अमरावतीच्या जिल्हाध्यक्षपदी भारत मलवार यांची नियुक्ती. --------------------------------  अमरावती जिल्हा प्रतिनिधी    गजानन जिरापुरे --------------------------------  तिवसा:- अक्षर मानव संघटनेच्या अमरावती जिल्हाध्यक्षपदी तिवस्याचे भारत मलवार यांची निवड करण्यात आली. आजपासुन ते जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी स्विकारतील. हि घोषणा अक्षर मानव महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण जावळे यांच्या परवानगीने संघटनेचे राज्य कार्यवाह तथा पालकमंत्री अक्षर मानव विदर्भ आझाद खान यांनी ही घोषणा केली. त्यांनी भारत मलवार यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अक्षर मानव जात, धर्म, पंथ, लिंग, भाषा, प्रदेश असे सारे भेद दुर करुन माणूस सजग,निर्मळ व्हावा यासाठी संघटना काम करते माणूस हा निव्वळ माणूस म्हणून जगू शकतो या साठी धडपडते साहित्य,समाज, आरोग्य, कला, शिक्षण,श्रम, विज्ञान, अश्या मानवी जीवन जगण्याच्या 70 विषयात संघटना काम करते. कुटुंब आणि समाजव्यवस्था दुरुस्त करणारी अक्षर मानव संघटना आहे. संपूर्ण महाराष्ट्रात माणसानं साठी काम करणारी एकमेव संघटना आहे. असे राज्य क...

जिल्हा परिषदेमार्फत मराठी शाळेच्या उपक्रमास सुरुवात गुढीपाडवा शाळा प्रवेश वाढवा.

Image
  जिल्हा परिषदेमार्फत मराठी शाळेच्या उपक्रमास सुरुवात गुढीपाडवा शाळा प्रवेश वाढवा. --------------------------------------  हुपरी प्रतिनिधी   जितेंद्र जाधव -------------------------------------  चैत्रशुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा हिंदू नववर्षातील प्रथम दिन असून कोणत्याही कार्याची सुरुवात त्यासाठी साडेतीन मुहूर्तापैकी एक असा पवित्र समजला जातो या आध्यात्मिक पार्श्वभूमीचा उपयोग शैक्षणिक कामासाठी करून घेत या दिवशीच पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश जिल्हा परिषदेच्या शाळेत निश्चित करावा या उद्देशानेच गुढीपाडवा शाळेत प्रवेश वाढवा हा उपक्रम जिल्हा परिषदेमार्फत राबविला जातो या गुढीपाडव्याच्या दिवशी 6 वर्षे पूर्ण असणाऱ्या आपल्या बालकांचा जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश निश्चित करून आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्याचा शुभारंभ करावा असे आव्हान जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर मीना शेंडकर यांनी केले आहे   जिल्हा परिषद च्या शाळांमध्ये शंभर टक्के पट नोंदणी नियमित उपस्थिती आणि गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी मोफत गणवेश मोफत पाठ्यपुस्तके दुपारचे जेवण श...

व्हाँईस आँफ मीडीया खंडाळा तालूका कार्यकारणी पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देऊन सन्मानित.

Image
 व्हाँईस आँफ मीडीया खंडाळा तालूका कार्यकारणी पदाधिकारी  यांना नियुक्ती पत्र देऊन सन्मानित.   ---------------------------                जावली  प्रतिनिधी शेखर जाधव  ---------------------------  सातारा/ :- खंडाळा  व्हाँईस आँफ मीडीया पत्रकारांच्या न्यय हक्कां साठी लढणारी बावन्न देशात कार्यरत असणारी भारतातील एक नंबरला असणारी ऐकमेव संघटना म्हणजे व्हाँईस आँफ मीडीया याच संघटनेची मुहूर्त मेड रोवली काही दिवसापूर्वी सातारा जिल्ह्यात  संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री संदीपजी काळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि  पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री सचिनजी मोहिते साहेब  यांच्या  मार्गदर्शनाने . सातारा जिल्हा अध्यक्ष श्री अनिल करंदकर(पाटील) आणि सातारा जिल्हा कार्यकाणी पदाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज नविन वर्षाच्या मुहूर्तावर खंडाळा तालुका कार्यकारणी नवनियुक्त पदाधिकारी यांच्या निवडी  आणि नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे नियोजन शासकीय खंडाळा गेस्टहाऊस या ठिकाणी करण्यात आले य...

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये 'गुढी पाडवा - शाळा प्रवेश वाढवा' उपक्रमास उस्फूर्त प्रतिसाद *

Image
  कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये 'गुढी पाडवा - शाळा प्रवेश वाढवा' उपक्रमास उस्फूर्त प्रतिसाद * -------------------------------------------------- शशिकांत कुंभार  -------------------------------------------------- चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढी पाडवा हा हिंदू नववर्षातील प्रथम दिन असून कोणत्याही कार्याची सुरूवात करणेसाठी साडेतीन मुहूर्तापैकी एक असा पवित्र समजला जातो. या अध्यात्मिक पार्श्वभूमीचा उपयोग शैक्षणिक कामासाठी करुन घेत या दिवशीच पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश जिल्हा परिषदेच्या शाळेत निश्चित करावा या उद्देशाने 'गुढी पाडवा शाळा प्रवेश वाढवा' हा उपक्रम कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत दरवर्षी राबविला जातो. जिल्हा परिषदेच्या शाळांमार्फत गुढी पाडव्यादिवशी दाखलपात्र विद्यार्थी व त्यांचे पालक यांना अगत्यपूर्वक शाळेत आमंत्रित करावे, दाखलपात्र विद्यार्थ्यांचे यथोचित स्वागत करावे तसेच दाखलपात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज भरुन त्यांचा शाळेतील प्रवेश निश्चित करणेबाबत कळविणेत आले होते. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये 'गुढी पाडवा शाळा प्रवेश वाढवा' या उ...